गारपिटीचा इशारा ; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा…
गारपिटीचा इशारा ; राज्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाले असून पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सुद्धा कोकण वगळता सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा वर्तवलाय. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.
हवामान खात्याने विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील वातावरणात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
20 March, Extended range forecast for rainfall for 4 weeks by IMD today.
Watch for the possibility of rainfall in all weeks over parts of #Kerala & south #Karnataka
Aldo parts of NE region & adj areas, parts of J&K. pic.twitter.com/lJkQ7JlhxB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 20, 2025
विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यात पुढचे तीन दिवस गारपिटीचा इशारा दिला आहे. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील ५ दिवस, विदर्भात काही ठिकाणी विजांसह गडगडाटी वादळे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD…… भेट घ्या. pic.twitter.com/bhlKMP384S— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 19, 2025