जिवंत सातबारा मोहिम : जिवंत सातबारा मोहिमेत शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार…
जिवंत सातबारा मोहिम : मृत व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन त्याच्या वारसाच्या नावावर करण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. हि प्रक्रिया सोपी आणि सहज व्हावी यासाठी राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेत मृत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसाच्या नावावर केली जाणार आहे.
महसूल विभाग 100 दिवसाचा आराखडा तयार करुन हि मोहिम हाती घेणार आहे. या 100 दिवसात राबवल्या जाणाऱ्या मोहिमेत मृत खातेदाराच्या वारसाच्या नावावर जमीन करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी कामात तसेच इतर सेवा योजनाचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण राहणार नाही आणि पारदर्शकता वाढेल. (जिवंत सातबारा मोहिम)
महसूल विभाग यासाठी स्वतंत्र मोहिम राबवणार असुन अर्जदाराने अर्ज न करता मृत व्यक्तीचे नाव सातबारा वरून कमी करून वारसाच्या नोंदी करण्यात येणार आहे. हि मोहिम 01/एप्रिल पासून राबवली जाईल त्याबद्दल 19/मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना काय फायदे होणार…
मृत व्यक्तीच्या नावावर जमीन असल्याने शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या अडचणी येतात या अडचणी पासून आता सुट्टी मिळणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या नावावरील जमीन वारसाच्या नावावर करण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. जिवंत सातबारा मोहिमेत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहे.