मान्सून आल्यावर सुद्धा पाऊस का पडत नाही – माणिकराव खुळे
मान्सून न्युज ; बहुतांश शेतकऱ्यांना पडणारा प्रश्न आहे कि मान्सून दाखल झाल्यानंतर सुद्धा पाऊस का पडत नाही. मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस पडण्यासाठी कोणत्या वातावरण प्रणाल्या परिणाम करतात तसेच मान्सून दाखल झाल्यानंतर कधी पाऊस पडतो यावर हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाला सुरुवात होईल असे शेतकऱ्यांना वाटते परंतु हवामान विभागाचे तज्ञ माणिकराव खुळे म्हणतात की मान्सून दाखल झाला की पाऊस पडेलच असे नाही. पाऊस पडण्यासाठी वातावरणात अनुकूल घटक तयार व्हायला पाहिजे. हवेचा दाब, कमी दाबाचे क्षेत्र, चक्रिय वाऱ्याची स्थिती, चक्रिय वाऱ्याची उंची, जाडी, ताकद या सर्व बाबी तयार असल्या तर मान्सूनचा पाऊस पडतो या बाबी अनुकूल नसल्या तर मान्सून येवुन सुद्धा पाऊस पडत नाही. (माणिकराव खुळे)
वारे आद्रता घेऊन पोहचु शकतात त्या ठिकाणी मान्सूनचा पाऊस पडतो. तसेच मान्सून महाराष्ट्र ओलांडून पुढे गेला म्हणजे महाराष्ट्र सारखा पाऊस पडणार आहे का असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यावर खुळे म्हणतात वातावरणात हवेचा दाब, कमी दाबाचे क्षेत्र, चक्रिय वाऱ्याची स्थिती, चक्रिय वाऱ्याची उंची, जाडी, ताकद या सर्व बाबी तयार असल्या तर मान्सूनचा पाऊस पडतो. (Monsoon news manikrao khule meteorologist Retd IMD)
मान्सून आला म्हणजे लगेचच पाऊस होत नाही किंवा मान्सून महाराष्ट्र ओलांडून पुढे गेला तर महाराष्ट्रात सलग पाऊस होत नाही मान्सूनच्या पावसासाठी वातावरणात अनुकूलता असने अतिशय महत्त्वाचे आहे.. (माणिकराव खुळे)