वीज कोसळणे – वीजा का पडतात, संरक्षणात्मक उपाययोजना कशा कराव्यात…
वीज कोसळणे – वीज कोसळणे हि नैसर्गिक आपत्ती असुन वादळाच्या वेळी ढगाच्या घर्षणाने तयार होणारी चमक आहे. वीज पडण्याच्या वेळेस वातावरणातील वायूंचे आयनायझेशन होऊन विद्युत प्रवाह निर्माण होतो आणि जमिनीपर्यंत पोहोचतो. यामुळे प्रचंड मोठी उष्णता, प्रकाश आणि आवाज निर्माण होतो.
वीज पडताना आवाज (गडगडाट) होण्याचे कारण विजेच्या अतिउष्णतेमुळे होय. विजाचे तापमान साधारणतः 30000 ते 50000 अंश सेल्सिअस इतके जास्त असते. वीजनिर्मितीच्या वेळी ढगांजवळ हवा विजाच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते. या अतीवेगाने प्रसारण पावणाऱ्या हवेच्या दाबामुळे मोठा गडगडाटी आवाज निर्माण होतो.
विजा कडाडत असताना सुरक्षित स्थान नसले तरी मोठ्या बंदिस्त इमारती किंवा धातूची बंदिस्त वाहने जसे कार, ट्रक, बसेस, व्हॅन आणि पूर्णपणे बंदिस्त वाहन हे निवाऱ्यासाठी चांगले पर्याय आहेत. वीज कोसळण्याच्या काळात या ठिकाणी आसरा घेणे सर्वात सुरक्षित आहे. वीज कोसळण्याच्या काळात उघड्यावर जाणे टाळावेच. तसेच झाडाखाली थांबू नये. उघड्या मैदानात असताना लोखंडी वस्तूंना स्पर्श करू नये. जर आपण बाहेर असाल तर लवकरच सुरक्षित जावे.
आपल्या महाराष्ट्रात ऑक्टोबर ते जुन या दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता असते, यादरम्यान बहुतांश ठिकाणी गारपीट सुद्धा होते आणि वीजा पडतात. वीजा पासून सुरक्षा आणि वीजेची माहिती देणाऱ्या ॲप्लिकेशनचा वापर करावा. हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद…