शेतकरी कर्जमाफी : अर्थमंत्री अजित पवार म्हणाले दोन दिवसांत पिककर्ज भरा…

शेतकरी कर्जमाफी : अर्थमंत्री अजित पवार म्हणाले दोन दिवसांत पिककर्ज भरा…

शेतकरी कर्जमाफी : महायुती सरकार सत्तेवर येवुन तिन चार महिने पुर्ण आहे आहे. सत्तेत आल्यानंतर हिवाळी अधिवेशन पार पडले त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. मात्र निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलेला दिसतोय. आतापर्यंत कर्जमाफी होणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण काल दि. 28/मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले की 31/मार्च पर्यंत पिककर्ज भरा पुढे तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी शक्य नाही.

निवडणूक प्रचारात महायुती कडून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु लाडकी बहिण योजना आणि मोफत विज तसेच इतर योजना मध्ये मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असल्याने सध्या शेतकरी कर्जमाफी होणार नाही तरी येत्या दोन दिवसांत पिककर्ज भरावे असे अजित पवार यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे.

 

यापुर्वी अनेकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की सर्व प्रकारचे सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पुढची तीन वर्षे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लागणार असून शेतकऱ्यांनी आपआपल्या पिककर्जाची परतफेड करावी.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी पिककर्ज भरले नाहीत तरी आता कर्जमाफी करणे शक्य नाही तरी शेतकऱ्यांनी पिककर्ज भरा असे अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.

 

Leave a Comment