मान्सून आला म्हणजे काय ? मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का?
मान्सून पोहोचला म्हणजे काय तसेच मान्सून पोहोचला कि लगेच पाऊस सुरू होतोच का ? यावर हवामान विभागाचे निवृत्त तज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे, पाहुया काय म्हणतात खुळे साहेब….
मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस होईलच असे नाही आणि मान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या मुळ उगमस्थानापासून विषुववृत्तावरील म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील पेरु ,कोलंबिया, इक्वेडोर या देशापासून समुद्रावरून अंदाजे 19 हजार कापुन वाहत आपल्या गावापर्यंत बाष्प घेऊन येणाऱ्या वातावरणीय प्रणालीद्वारे पुर्वेकडुन पश्चिमेकडे समांतर वाहता झाला की मान्सून आला असे म्हणतात. त्यामुळे भारतात चार महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्येकडून इशान्येकडे वाहतात..
माणिकराव खुळे म्हणतात या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जास्त उर्जा, ताकद असेल तरच पाऊस होतो अन्यथा नाही. म्हणजे बाष्पयुक्त ऊर्जा पावसाळ्यात कमी होते. बाष्पयुक्त वाऱ्यात ऊर्जा कमी झाली तर यामध्ये पुन्हा ऊर्जा बाष्पयुक्त वारेच भरु शकतात. म्हणून त्यासाठी मान्सून वारे पोहचणे गरजेचे असते. म्हणून कधीकधी मान्सून आपल्या गावापासून पुढे गेला तरी पाऊस होत नाही आणि शेतकरी गोंधळात पडतात.
यंदा जर तशी परिस्थिती आली तर काळजी करण्याची गरज नाही कारण यंदा ला – निना सक्रिय झालेला असल्याने बाष्पयुक्त उर्जास्रोताची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असेल. त्यामुळे मान्सून प्रवासादरम्यान ऊर्जा कमी झाली तर निसर्गतः आपोआप भरण्याची व्यवस्था होते. (माणिकराव खुळे)