सोयाबीन तणनाशक ; उगवणपुर्व तननाशक फवारणी करताना काळजी घ्या

सोयाबीन तणनाशक ; उगवणपुर्व तननाशक फवारणी करताना काळजी घ्या

सोयाबीन तननाशक ; आपल्या महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. सोयाबीन मध्ये तनांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी लागवडीनंतर 48 ते 72 तासांच्या दरम्यान उगवणपुर्व तननाशकाची फवारणी करतात.
सोयाबीन मध्ये उगवणपुर्व तननाशकाची फवारणी केल्यावर तन उगवत नाही. काही शेतकऱ्यांना उगवणपुर्व तननाशकांचा चांगले रिझल्ट मिळतात तर काही शेतकऱ्यांना फवारणी केल्यानंतर तनांचा प्रादुर्भाव होतो तर उगवणपुर्व तननाशकाची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती पाहुया…

1) कोणत्याही कंपनीचे तननाशकाची फवारणी करताना कंपनीने शिफारस केल्याप्रमाणे फवारणी करावी तननाशकाचे प्रमाण कमी जास्त करु नये.

2) एक एकरासाठी जेवढे औषधाचे प्रमाण तेवढे औषध आणि आणि पाण्याचे प्रमाण घ्यावे.

3) पेरणीनंतर मातीचा वरचा थर ओला असतो तेव्हा लगेच फवारणी करा… फवारणी करताना माती ओलसर असावी.

4) फवारणीसाठी पावसाचे पाण्याचा वापर करु नये, स्वच्छ पाण्याने फवारणी करा.

5) आता शेतकरी पेरणी यंत्राच्या (ट्रॅक्टर ने) साहाय्याने फवारणी करतात, मात्र यामध्ये पाणी कमी वापरले जाते, त्यामुळे रिझल्ट मध्ये तफावत दिसून येते.

6) तणनाशकाचा वापर शेतात केल्यावर कोळपणी खुरपणी केल्यास तणनाशकाचा थर तुटतो आणि गवत पुन्हा वाढू लागते.

7) उगवणपुर्व तननाशक फवारणी करताना इतर कोणतीही औषधे त्यामध्ये वापरू नका.

8) उगवणपुर्व तणनाशकाची फवारणी केल्यानंतरही गवत उगवले तर 20 ते 25 दिवसांनी सोयाबीन तणनाशकाची पुन्हा फवारणी करता येते.

प्रत्येक कंपनीमध्ये उगवणपुर्व तननाशकाची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात, त्यामुळे निवडलेल्या कीटकनाशकाची वैशिष्ट्ये जाणून घेऊन त्याची मात्रा फवारणीसाठी घ्यावी. प्रमाण कमी किंवा जास्त असल्यास परिणाम चांगले नाहीत. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन उगवणपुर्व तननाशकाची फवारणी करावी. योग्य फवारणी 100% परिणाम देते आणि तण काढण्याची गरज राहत नाही. ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि नवनवीन माहितीसाठी आपला whatsaap ग्रुप जॉईन करा..

Leave a Comment