गारपिटीचा इशारा ; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा…

गारपिटीचा इशारा ; राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा…

गारपिटीचा इशारा ; राज्यात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाले असून पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने सुद्धा कोकण वगळता सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा वर्तवलाय. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीच्या वेळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.

हवामान खात्याने विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील वातावरणात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.

विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यात पुढचे तीन दिवस गारपिटीचा इशारा दिला आहे. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

Leave a Comment